Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईत (Crop Damage Compensation) २५ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील शासन निर्णय महसूल (Revenue Department) आणि वन विभागाने (Forest Department) जारी केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईचे सुधारित दरही जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील विविध भागात सुमारे एक लाख ३९ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईच्या सुधारित दरांनुसार जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे तर बागायतीसाठी हेक्टरी १७ हजारांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.
ऐन काढणीवेळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन काढणीवेळी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले आहे. अशावेळी नुकसनाग्रस्त भागातील पंचनामे तातडीने करणे गरजेचे होते.
मात्र, याच दरम्यान, राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर गेले होते. त्यामुळे सुरूवातीला नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
याच मुद्यावरून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सराकरला धारेवर धरले होते. विरोधकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे लावून धरली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.