
जव्हार, जि. पालघर : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण आदिवासी भागांमध्ये मकरसंक्रांत सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. वर्षाचा हा पहिला सण असल्याने नागरिक नातेवाईक मित्रपरिवाराला तिळगुळ देऊन स्नेह व्यक्त करीत असतात. परंतु यंदा संक्रांतीच्या तोंडावर तीळ (Sesame Rate) महागल्याने तिळगुळाचा गोडवा कमी झाला आहे. कारण यंदा तिळाच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
मकर संक्रांतीला तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात यावा म्हणून या दोन वस्तूंपासून बनलेल्या पदार्थाची देवाण-घेवाण करण्याची परंपरा आहे. तालुक्यात तिळाचे उत्पादन नसल्याने इतर शहरातील तिळाची विक्री होते. पण यंदा तिळाचा दर २४० ते २७० रुपये किलो इतका पर्यंतचा भाव मिळतो आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
सेंद्रिय गुळाला मागणी
मकर संक्रांतीनिमित्त गुळाच्या मागणीत वाढ होते. यंदा बाजारात गूळ ५५ ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. तर रासायनिक गुळापेक्षा सेंद्रिय गुळाचा भाव १५ ते २५ रुपयांनी अधिक आहे. पण मकर संक्रांतीनिमित्त सेंद्रिय गुळाची मागणी वाढली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.