
पातोंडा, जि.जळगाव ः केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान (Gatishakti Abhiyan) अंतर्गत अमळनेर - चोपडा रेल्वेमार्गाची ()Railway Rout चाचपणी करण्यात आली. या वेळी अमळनेर येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एल. बी. सिंग (वाहतूक निरीक्षक), वाणिज्य निरीक्षक राजेंद्र देसाई, वरिष्ठ अनुभाग अभियंता राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनुभाग अभियंता ओमप्रकाश यांनी पातोंडा ग्रामपंचायतीला भेट दिली.
केंद्र सरकारने संपूर्ण भारतातील ५० हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असणाऱ्या शहरांना रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गाने जोडण्यासाठी शक्ती व गती अभियान सुरू केले असून, जिल्ह्यातील चोपडा या शहराचा त्यात सामावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा सारखी इतर शहरे यापूर्वीच रेल्वेने जोडली गेली असल्याने सध्या चोपडा शहर हे ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर असल्याने अमळनेर ते चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अमळनेर ते चोपडादरम्यान असलेली व्यापारीदृष्ट्या व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन सर्वेक्षणाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत सुरू असताना या दरम्यान पातोंडा येथे भेट देऊन सरपंच भरत बिरारी यांनी गावातील बॅंका, पतपेढी, सेवाभावी संस्था, प्राचीन मंदिरे, तीर्थक्षेत्र, चहार्डी साखर कारखाना, जीनिंग व उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रस्तावित रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल, याबाबत माहिती दिली. याप्रसंगी सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, किशोर मोरे, राकेश पाटील, राजेंद्र वाणी, उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नाशिक जिल्ह्यात संगमनेर, बुलडाणा जिल्ह्यात चिखली आदी ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी शहरे केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियानांतर्गत रेल्वेने जोडली जाणार आहेत. यामुळे या शहरांचे सांस्कृतिक व व्यापारी महत्त्व वाढीस लागण्यास सहकार्य होईल.
- राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनुभाग अभियंता, अमळनेर (जि. जळगाव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.