Crop Insurance : २५ हजार बागायतदारांना २७ कोटींचा विमा परतावा मंजूर

फळपीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २६ हजार ६१३ लाभार्थ्यांपैकी ३ हजार ७८० काजू आणि २२ हजार ४८८ आंबा बागायतदारांना २७ कोटी ४७ लाख ७० हजार ६२४ रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

रत्नागिरी ः फळपीक विमा योजनेअंतर्गत (Fruit Crop Insurance Scheme) पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २६ हजार ६१३ लाभार्थ्यांपैकी ३ हजार ७८० काजू आणि २२ हजार ४८८ आंबा बागायतदारांना २७ कोटी ४७ लाख ७० हजार ६२४ रुपयांचा विमा परतावा (Insurance Refund) मंजूर झाला आहे. ही रक्कम बागायतदारांच्या (Horticulturist) बँक खात्यात थेट भरली जाणार आहे. यामध्ये उच्चतम तापमानामुळे झालेल्या नुकसानीचा परतावा देण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्यामुळे हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र सरकारने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील २६ हजार ६१३ लाभार्थ्यांपैकी बागायतदारांनी विमा उतरवला होता. आंबा, काजू मिळून १४ हजार ७३४ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला गेला. गतवर्षी आंबा, काजू हंगामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर फुलोरा आला होता; परंतु बदलत्या हवामानामुळे फळधारणा झालेली नव्हती. पाऊस आणि उच्च तापमान यामुळे फळगळही प्रचंड झाली होती. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अवकाळीचा फटका बसला. पुढे फेब्रुवारीत नीचांकी तर मार्चमध्ये पुन्हा उच्चतम तापमानामुळे पिकांचे नुकसान झाले.

Crop Insurance
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे हजारो दावे

सुरुवातीला उत्पादन कमी असल्यामुळे बाजारात दर होता. पुढे एप्रिलच्या अखेरीस दर कोसळले. त्याचाही फटका बागायतदारांना बसला. उत्पादन कमी राहिल्यामुळे अपेक्षित नफा-तोट्याचा ताळेबंद राखण्याचे बागायतदारांपुढे मागील हंगामात आव्हानच राहिले. तीन ते चार वाढीव फवारण्यांच्या खर्चाची भर पडल्याने बागायतदारांचे गणित कोलमडले. विमा लाभांशाचा आधार बागायतदारांना होता. नुकताच विमा परतावा संबंधित कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. विमा उतरवलेल्या एकूण बागायतदारांपैकी २२ हजार ४८८ जणांना परतावा मिळणार आहे. त्यात ३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६, तर २२ हजार ४८८ आंबा बागायदारांसाठी १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपयांचा परतावा मिळणार आहे. विमा कंपनीकडून बागायतदारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र ठरले, किती परतावा प्राप्त झाला याची माहिती कंपनीकडून दिलेली नाही.

Crop Insurance
Crop Insurance : विमा परताव्यासाठी २,९६५ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना

दरम्यान, काजू उत्पादकांना परतावा पूर्ण हंगामाचा जाहीर करण्यात आला आहे. परंतु आंबा उत्पादकांसाठी अवेळी पाऊस आणि नीचांकी तापमान यामुळे झालेल्या नुकसानीबाबत परतावा दिला आहे. अजूनही उच्चतम तापमानामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील लाभार्थी संख्या - २६ हजार ६१३

पहिल्या टप्प्यात विमा परतावा मंजूर झालेल्यांची संख्या - २२ हजार ४८८

मंजूर झालेली विमा परतावा रक्कम - २७ कोटी ४७ लाख ७० हजार ६२४ रुपये

३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी - ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६ रुपये

२२ हजार ४८८ आंबा बागायदारांसाठी - १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपये

]

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसांत शेतकऱ्यांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे. कंपनीकडून वेळेत परतावा दिला जात नाही. सध्या मिळालेली रक्कम यंदाच्या हंगामात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत कमी आहे.

- राजेंद्र कदम, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com