
पुणेः राज्यात पावासचं प्रमाण (Intensity Of Rain) आता कमी झालंय. बऱ्याच भागात हलक्या सरी (Light Rainfall) होत आहेत. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावतोय. हवामान विभागानं (Weather Department) आज पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केला आहे.
कोकणातही पावसाचा जोर कमी झाला. काही भागांत जोरदार सरी पडत आहेत. मात्र पाऊस कमी झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी उसंत मिळाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला. त्यामुळे नद्यांची पाणीपातळीही ओसरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने काहीशी उघडीप दिली. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी झाल्या.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही मंडळात पावसाचा जोर अधिक होता. नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात मात्र बुधवारीही पावसाचा जोर कायम होता.
विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली. तरी प्रकल्पांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि लगतच्या राज्यातील पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात १० मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. विदर्भात अनेक ठिकाणी बुधवारीही जोरदार पाऊस झाला. तर काही भागांत तुरळत सरी झाल्या.
राज्यात बहुतांशी भागात पाऊस कमी झाला. मात्र अनेक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. तर अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे शेतीकामे ठप्प होत आहेत. त्यामुळे आंतरमशागती धीम्या गतीने सुरु आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.