
बदनापूर, जि. जालना : मोसंबी (Mosambi) फळपिकाच्या अंबिया बहरासाठी ताणावर सोडलेल्या बागांच्या बहरपूर्व कामांना प्राधान्य देणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण प्रकल्प (स्मार्ट), मोसंबी केंद्र आणि प्रकल्प संचालक (आत्मा ) यांच्या संयुक्त्य विद्यमाने ॲग्रोगोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांसाठी केंद्रात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर स्मार्टचे समन्वयक अधिकारी श्रीकांत देशपांडे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दीपक कचवे, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास बारगजे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अरुण शिसोदे, सहायक व्यवस्थापक दिनेश पारडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी भराडखेडा, कडेगाव, अकोला, लायगाव, मानेपुरी आदी गावांतील मोसंबी उत्पादक उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, की ताणावर सोडलेल्या मोसंबी बागांमध्ये आंतरमशागतीची कामे करून वाळलेल्या, रोगट फांद्या, मागील हंगामाची वाळलेली फळे आदींची काढणी करून बागेबाहेर जाळून टाकावे. तसेच झाडांवर बोर्डो मिश्रणाची फवरणी घेतल्यास झाडावरील बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. प्रास्ताविक श्रीकांत देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन रामदास बारगजे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.