
रत्नागिरी ः अवकाळी पाऊस (Untimely Rain) आणि थंडी (Cold Weather) कमी झाल्यामुळे आंबा कलमांना (Mango Graft) आलेली पालवी अजूनही जून झालेली नाही. पालवीला मोहोर (Mango Bloom) येण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे.
गेले दोन ते तिन दिवस हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविलेली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. ६) रात्री हलका पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर हवेत उष्मा होता. मागील आठवडाभरात थंडी गायब झाली आहे.
सलग ढगाळ वातावरणामुळे आंबा कलमांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यापासून पालवी आणि मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागली. मंगळवारी पडलेल्या पावसामुळे पालवी फुटलेल्या कलमांनाही पालवी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जून झालेल्या पालवीला मोहोर येण्यासाठी अजून १५ ते २० दिवस लागतील. किडीपासून मोहोर वाचविण्यासाठी औषध फवारणीचा पर्याय अवलंबावा लागत आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढलेला आहे. अपेक्षित उत्पादन हाती कधी लागणार, या बाबत बागायदारांमध्येच संभ्रम आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.