
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः मजुरीत वाढ द्यावी तसेच नवीन माथाडी करार करावा या मागण्यासाठी सोमवारपासून (ता. ७) काम बंद केलेल्या माथाडींना निलंबित करावे तसेच बाहेरच्या गावातून माथाडी कामगार आणून सौदे सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
त्यानुसार येथील बाजार समितीत बुधवारी (ता. ८) पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे (Jaggery Deals) पूर्ववत सुरू झाले. यात गुळाला २००० ते ३८०० चा सरासरी भाव मिळाला.
जिल्ह्याधिकारी रेखावार यांनी घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन बाहेरगावचे माथाडी कामगार बोलवून काम करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार गडहिंग्लज, गांधीनगर, जयसिंगपूर मलकापूर येथील माथाडी कामगार बोलवले या माथाडीना मार्केट यार्डतील माथाडींकडून विरोध होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला.
तसेच माथाडी नेत्यांना मार्केट यार्डात बेकायदा जमाव करून नये यासाठी १४४ कलमही लागू केले. त्यानुसार सकाळी सातपासून गूळ सौद्यांना सुरुवात झाली.
एक दिवसात दहा हजार गूळ रव्यांची आवक झाली. दुपारी बारापर्यंत नव्याने आलेले व शिल्लक अशा ८० हजार गूळ रव्यांचे सौदे झाले. यात २००० ते ४२०० रुपये भाव मिळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.