Agriculture Land Utilization : भारतासमोर जमीन उपयोगितेचे मोठे आव्हान

वाढत्या अकृषिक जमिनीमुळे अन्न सुरक्षेचा धोका
Agriculture Land
Agriculture LandAgrowon

Nagpur News :जगात प्रतिमाणशी जमीनधारणा (Land Holding) कमी झालेल्या देशांमध्ये भारत हा एकमेव आहे. त्यातही लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र (Agriculture Land) प्रतिव्यक्‍ती ०.११ हेक्‍टर इतकेच आहे. भविष्यात हे क्षेत्र कुटुंबाचे विभाजन झाल्यानंतर आणखी कमी होणार आहे.

याची दखल घेत जमीन अकृषिक (Non Agriculture Land) करताना कृषक आणि अकृषिक जमिनीचे डिमार्केशन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय मृदा संशोधन व जमीन उपयोगिता संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील (Dr, Nitin Patil) यांनी व्यक्‍त केले.

डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे जमीनधारणा प्रतिमाणसी कमी झाली आहे. लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र प्रतिव्यक्‍ती ०.११ हेक्‍टर इतकेच आहे.

पहिली समस्या म्हणजे अतिशय कमी क्षेत्रावर शेती करणे परवडत नाही. अशा छोट्या क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण फायदेशीर ठरत नाही. परिणामी मजुरांच्या भरवशावर असलेल्या या शेतीत खर्च वाढीस लागतो.

व्यवस्थापनावर मजुरांमुळे अधिक खर्च होतो. छोट्या क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण परवडणारे नसते. वातावरणातील बदलाचा परिणाम होतो. लहान जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या अडचणींची भर पडली आहे.

Agriculture Land
Food Security Mission : ‘अन्नसुरक्षा’अंतर्गत दिंडोरीत डिसेंबरपर्यंत मिळणार धान्य

‘‘दरम्यान, गृहनिर्मिती, रस्ते, वीज यासह इतर पायाभूत सुविधांसाठी जमिनीला मागणी राहते. ३३ टक्‍के भूभाग जंगलासाठी ठेवावा लागतो. अशातूनच मग संघर्ष वाढतो. त्यामुळे जगात कुठेही नसेल इतके मोठे जमीन उपयोगितेचे आव्हान भारतापुढे आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर सुपीक जमीन टिकविणे आणि तिचे अस्तित्व राखणे गरजेचे आहे. त्याकरिता अशी जमीन डिमार्क करावी लागणार आहे,’’ डॉ. पाटील म्हणाले.

‘‘सध्या जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात जमीन अकृषिक करण्याचा निर्णय घेतात. परंतु भविष्यातील अन्न सुरक्षेचा आढावा किंवा समीक्षण त्यांच्याव्दारे होत नाही.

ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर सरसकट जमीन अकृषिक न करता त्याची पडताळणी केली पाहिजे.

त्यातच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्याने शहरीकरण, औद्योगीकरण होत असल्याने या समस्या अधिक विक्राळ रुप धारण करीत आहेत. याच राज्यात सिंचनाच्या सोयी देखील मर्यादित आहेत. त्यामुळे या भागातील शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे.’’

Agriculture Land
Food Security : फुकटच्या धान्यातून कोणाची अन्नसुरक्षा?

‘जमिनीचा विषय गांभीर्याने घ्यावा’

आपल्या भागातील मातीचे गुणधर्म कोणत्या पीकपध्दतीला पोषक आहेत. याचाही विचार पीक लागवडीवेळी होत नाही. परिणामी निसर्गावर अवलंबित्व असलेल्या शेतीमधून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. या साऱ्या कारणांचा विचार करता येत्या काळात जमीन उपयोगितेचा विषय‍ गांभिर्याने घेण्याची गरज आहे,’’ असेही डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३२९ दशलक्ष हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी १४१ दशलक्ष हेक्टर जमीन वहिवाटीखाली आहे. सिंचन प्रकल्प, रस्ते, वाढते शहरीकरण यासाठी पेरणी योग्य जमिनीचा उपयोग होतो. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लँड रिसोर्स इन्व्हेंटरी हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याद्वारे लागवडीखालील, पडीक व इतर जमिनींचा अभ्यास केला जाणार आहे. आंध्र प्रदेशपासून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे.
- डॉ. नितीन कोंडे, सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, ‘पंदेकृवि’, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com