Water Reservoir : धरणांत यंदा कमी पाणीसाठा

उन्हाचा पारा वाढल्याने धरणातील पाणीपातळी घटू लागली आहे. यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
Water Storage
Water StorageAgrowon

Pune News : उन्हाचा पारा (Summer Heat) वाढल्याने धरणातील पाणीपातळी (Dam Water Level) घटू लागली आहे. यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रब्बी हंगाम (Rabi Season) आणि उन्हाळी आवर्तन सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला आहे.

यामुळे धरणांत कमी पाणीसाठा (Water Stock) असून, पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत अवघा ८१.३० टीएमसी म्हणजेच ४० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. जून ते जुलैपर्यत पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात उजनीसह लहान मोठी एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता. गेली पाच ते सहा महिने महिन्यांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

Water Storage
Water Shortage : जळगाव जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची समस्या कमी

सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार काही आवर्तन सोडण्यात आली होती. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणांत १०७.५९ म्हणजेच ५४ टक्के पाणीसाठा होता.

Water Storage
Water Shortage : पाणीउपशावर नियंत्रण आवश्‍यक

यंदा जानेवारीपर्यंत पाण्याची फारशी मागणी नसल्याने तीन ते साडेतीन महिन्यांत जवळपास ६०.५८ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली. सध्या जिल्ह्यातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा जूनमध्ये वेळेवर पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार आहे.

आतापर्यंत सुमारे १२१.३७ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असला तरी धरणातील मुबलक असलेली पाण्याची स्थिती पाहता येत्या काळात पाणीटंचाई कमी भासण्याची शक्यता आहे.

Water Storage
Water Shortage : लघू प्रकल्पांतील ११ टक्के पाणीसाठा घटला

पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान, पवना या धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्‍चिमेकडील धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो.

सध्या खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, उजनी या धरणातून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. याचा वापर शेतीसाठी केला जात आहे.

याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.

सोमवार (ता. ३) पर्यंतचा धरणनिहाय

उपयुक्त असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये

टेमघर ०.३५, वरसगाव ८.१०, पानशेत ४.८०, खडकवासला १.०४, पवना ३.८८, कासारसाई ०.२६, कळमोडी १.४०, चासकमान २.९०, भामा आसखडे ४.५५, आंध्रा २.०४, वडीवळे ०.४७, शेटफळ ०.३४, नाझरे ०.३१, गुंजवणी २.०३, भाटघर ८.६४, नीरा देवघर ६.२३, वीर ५.८६, पिंपळगाव जोगे १.६७, माणिकडोह २.०९, येडगाव १.२३, वडज ०.४२, चिल्हेवाडी ०.४१, घोड १.४७, विसापूर ०.३९, उजनी १४,६९, मुळशी ८.०८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com