
दौंड : ‘‘गेल्या काही वर्षांपासून लोकांचा दैनंदिन आहार (Daily Diet) घेताना काही प्रमाणात बदल झाला आहे. त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हे परिणाम टाळण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा (Millet In Diet) जास्तीत जास्त समावेश करावा,’’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वतीने दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२२-२३’ निमित्त ‘पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्त्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सरपंच छाया झगडे, उपसरपंच आरती झगडे, ग्रामपंचायत सदस्य सलमा सय्यद, संदीप जगताप, छगन झगडे, गणेश शिंदे, रेखा निंबाळकर, संध्या शितोळे, कृषी सहायक शंकर कांबळे, प्रकाश लोणकर आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२२-२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त संपूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्याविषयी जनजागृती सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे बाजरी तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी चर्चा करण्यात आली.’’
दौंडचे आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी विविध तृणधान्यांची ओळख करून दिली. जिल्हा संसाधन व्यक्ती दिलावर शेख यांनी शेतकरी व महिला भगिनी यांना विविध तृणधान्यापासून खाद्यपदार्थ निर्मिती व त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी सहायक अझरुद्दीन सय्यद यांनी बाजरीचे आहारातील महत्त्व समजून सांगितले. कृषी पर्यवेक्षक अतुल होले यांनी सूत्रसंचालन केले. अंगद शिंदे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.