सांगली : जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाचनंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) झाला. सांगली, मिरज शहरासह तासगाव, कडेगाव, कवठे महांकाळ, आटपाडी तालुक्यांत चांगला पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरणार आहे. परंतु या पावसामुळे द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामान ढगाळ आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सायंकाळी मिरज विटा आटपाडी या तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला. इतर भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. सध्या द्राक्षाच्या फळ छाटणीची तयारी शेतकरी करू लागला आहे. परंतु हा पाऊस द्राक्ष फळ छाटणीसाठी अडचण ठरू शकते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मंगळवार सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारपासून दुष्काळी पट्ट्यात पावसाची रिपरिप सुरू होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.