
महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाचे दासगाव ते वीर या टप्प्यातील सुमारे तीन किलोमीटरचे काम वनखात्याची (Forest Department) परवानगी नसल्याने बंद होते.
काही दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्याने सध्या काम सुरू आहे. वन खात्याने सरकारी जमिनीला (Government Land) हिरवा कंदील दिला असला तरी काही जमीन मालकांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याने येथील कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महामार्गाचे महाड (Mahad) आणि पोलादपूर (Poladpur) या दोन तालुक्यांत ३८.७६ किमीचे काम आहे.
या टप्प्यांत ३५ किमीचे काम ‘एल अँड टी’कडून पूर्ण झाले. वीर आणि दासगावदरम्यान ज्या वनखात्याच्या सरकारी जमिनी आहेत, त्यांना वन खात्याकडून कामाची परवानगी मिळाली आहे.
या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. मात्र ज्या खासगी जमिनींवर ‘वनजमिनी’ असा उल्लेख करण्यात आला आहे अशा जमिनींना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने ते मालक मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.