नगर : नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात २४ आणि २५ तारखेला जिल्ह्याच्या काही भागात वादळासह गारांचा तडाखा (Storm) बसला. या अवकाळी पावसाचा (Avkali Rain) सर्वाधिक फटका राहुरी (Rahuri) आणि नेवासे (Newasa) तालुक्यांना बसला आहे.
कृषी विभागाने (Agricultural Department) केलेल्या प्राथमिक पाहणीत दोन्ही तालुक्यांतील १ हजार ४२१ हेक्टरवरील गहू (Wheat), कांदा (onion), मका (Maize)आदी पिकांचे नुकसान झाले.
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील कात्रड, गुंजाळे या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गहू भुईसपाट झाला होता.
नेवासे तालुक्यातील चांदे परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला होता.
त्यांनी कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. राहुरी तालुक्यात ५८१ हेक्टरवर कांदा, गहू, मका आदींचे नुकसान झाले.
नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. नेवासे तालुक्यातील चांदे आणि परिसरातील गावांमधील ८३० हेक्टरवर कांदा, गहू आणि मका यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राथमिक अहवाल प्राप्त झाला.
जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून अहवाल राज्य सरकारकडे भरपाईसाठी पाठविण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.