Organic Farming : राज्यात २५ लाख हेक्टरमध्ये सेंद्रिय शेती अभियान राबविणार

राज्याचा पर्यावरणपूरक सर्वांगिण विकास साधण्यावर सरकारचा भर आहे. याअंतर्गत आता राज्यातील २५ लाख हेक्टर जमिनीमध्ये सेंद्रिय शेती अभियान राबविले जाणार आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

Kolhapur News राज्याचा पर्यावरणपूरक सर्वांगिण विकास साधण्यावर सरकारचा भर आहे. याअंतर्गत आता राज्यातील २५ लाख हेक्टर जमिनीमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming) अभियान राबविले जाणार आहे. सेंद्रिय खतांना (Organic Fertilizer) अनुदान देण्याचा विचार आहे.

पंचमहाभूतांचे संतुलन आणि पर्यावरणाचा समतोल साधत समृद्धी, विकासाच्या दिशेने वाटचाल करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. २०) येथे केले.

Eknath Shinde
Organic Farming : सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी संशोधक सिद्धगिरीत येतील

कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘सुमंगल पंचमहाभूत’ लोकोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मठाधिपती काडसिद्धेश्‍वर स्वामी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी, खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, महाराष्ट्र-कर्नाटकसह अन्य राज्यांतून आलेले भाविक, नागरिकांच्या उपस्थितीच मंगलवाद्यांचे सूर अशा उत्साही वातावरणात लोकोत्सवास शानदार प्रारंभ झाला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या लोकोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या हिताचा संकल्प केल्याबद्दल अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामींना धन्यवाद देतो.

या लोकोत्सवात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंचमहाभूतांच्या असंतुलनामुळे हवामानातील बदल होऊन विविध नैसर्गिक आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे.

Eknath Shinde
Onion Market : कांदा दरातील घट रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना आवश्यक

त्याला आपणच जबाबदार आहोत. पर्यावरणपूरक वाटचालीसाठी या लोकोत्सवातून सुचविण्यात आलेल्या पर्यायांचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. पर्यावरण रक्षण, स्वावलंबी शेतकरी, वेस्ट टू वेल्थ, रोजगारनिर्मिती, आदींबाबतची दिशा घेऊन विकासाची पाऊले टाकूया.

या लोकोत्सवाला चळवळ बनवून त्याची राज्यभर व्याप्ती वाढवूया. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आपण जर वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही, अशी सध्या स्थिती आहे.

या लोकोत्सवाच्या माध्यमातून निसर्गाची जपणूक करण्याची निश्चितपणे प्रेरणा मिळेल. मठाचे हे कार्य प्रेरणादायी आहे. श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला.

लोकोत्सवाची वैशिष्ट्ये...

लोकोत्सवातून पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची ‘सुमंगलम पंचमहाभूत’ लोकोत्सवात उपस्थिती असेल.

अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहाणी या लोकोत्सवात उलघडणार आहे. या लोकोत्सवात २८ राज्यांतील भाविकांसह तब्बल ५० देशांतील परदेशी पाहुणे, एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन ही पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवाची वैशिष्ट्ये असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com