Paddy Crop Damage : पावसामुळे भातशेती संकटात
कासा, जि. पालघर : परतीच्या पावसाने डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Paddy Crop Damage) झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिवळे सोने वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी होत आहे.
या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. भात लावणीदेखील चांगली झाली होती. सध्या तर भातपीक कापणीस आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर भातपीक कापण्यास सुरुवात देखील केली होती.
पण गेल्या आठ दिवसांपासून दररोज संध्याकाळी परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतात कापलेले भातपीक पाण्यात भिजले आहे; तर अनेक ठिकाणी भातपीक जमीनदोस्त झाले आहे.
भातपीक परिपक्व झाले असल्याने कापणी करावी लागत आहे; परंतु पाऊस पडल्यास पीक पाण्यात भिजून नुकसान होण्याची भीती आहे. वारा व पावसामुळे उभे पीक आडवे होत आहे. दोन्ही बाजूने नुकसान होणार, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.