
खोपोली, जि. नवी मुंबई ः पाताळगंगा नदी (Patalganga River) रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असून शेकडो गावे व औद्योगिक क्षेत्रातून तिचा प्रवास सुरू आहे.
दीड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी याच नदीवर अवलंबून आहे. नदीतील प्रदूषण वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनेकदा नदीपात्रात मासे मृत होण्याच्या घटना समोर आल्या असून प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही बदलल्याचे दिसते. पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढण्याची कारणे अनेक आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर रसायन मिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यात येते. खोपोली शहरातील हजारो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जाते.
ॲसिड व घातक रसायन वाहून नेणारे टँकर नदीकिनारी उभी करून धुतले जातात. तसेच मासेमारीसाठी रसायन नदीच्या प्रवाहात टाकण्याचे प्रकारही घडत आहेत.
एकीकडे पाताळगंगा नदी प्रदूषित होत आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन, रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी एखादी घटना समोर आल्यावर केवळ नमुने तपासणी करून वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तपासलेल्या नमुन्याचे अहवाल काय, प्रदूषणास जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई केली, याबाबत अधिकृत प्रक्रिया पूर्णत्वास जात नसल्याने पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढतच आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.