औरंगाबाद ः अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झालेल्या औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) देण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सोमवारी (ता. 26) निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले, की औरंगाबाद तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्यातील काही तालुक्यात नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मात्र औरंगाबाद तालुका यामधून वगळण्यात आला आहे. औरंगाबाद तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी तसेच अतिवृष्टी झाली असतानाही या तालुक्याला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याशिवाय 2020 पासून डाळिंब, मोसंबी, कपाशी, तूर, मूग, उडीद असे अनेक पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही.
औरंगाबाद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने पावले उचलावी व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे पाटील, किसान सेना उपजिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, ज्ञानेश्वर डांगे, दीपक कणसे ,आकाश लेभे, गणेश दांडगे, रवी कसारे, नामदेव नलावडे, बबन वाघ, राजू चव्हाण, नारायण मुळे, नारायण पठाडे, दत्ता चौधरी, बबन पवार, कचरू पळसकर, आसाराम शेळके, कृष्णा गाडेकर, श्रीराम फुके यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.