Mango Pest Disease : आंब्यावर तुडतुडा, बुरशी

मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.
Mango Pest Disease
Mango Pest DiseaseAgrowon

Mango Season Update : मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. तुडतुडा आणि बुरशीजन्य रोगांचा (Mango Disease) शेवटच्या टप्प्यातील आंब्याला फटका बसला आहे.

मोहोरातून फळधारणा होण्यावेळीच तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन (Mango Production) मिळणे कठीण आहे. कोकणातून वाशी बाजारात पेटीच्या पेटी जात असतानाच बागायतदारांना शेवटच्या टप्प्यातील उत्पादनांची चिंता लागली आहे.

विदर्भासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतीला धक्का दिला आहे. तशी परिस्थिती कोकणात नाही. मात्र बदलते हवामान, तापमान व पावसाळी वातावरणामुळे तयार होणाऱ्या किडी-रोगांच्या समस्यांनी आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ४० अंशावर गेल्यामुळे फळगळीचे संकट होते. दक्षिणेकडील बागांमधील आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

त्यानंतर गेल्या चार दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली, पण त्यात जोर नव्हता. तरीही सकाळी, सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम घनदाट आणि मोठी झाडे असलेल्या बागांना बसला आहे.

Mango Pest Disease
Mango Market : वाशीत ६० हजार आंबा पेटी आवक

राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पावसासह आजूबाजूच्या परिसरातील बागांमध्ये तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

फळधारणा झालेल्या झाडांवर बुरशीजन्य रोग आला असून बारीक फळे गळून गेली आहेत.

पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहील. सध्या वाशी बाजारात सरासरी ५० हजार पेट्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून येत आहेत.

देवगडमधून सर्वाधिक ६० टक्के तर रत्नागिरीतून २० टक्के आंबा आवक आहे. उर्वरित आंबा कर्नाटक, आंध्र प्रदेशसह अन्य राज्यांतील आहे.

Mango Pest Disease
Mango Crop Damage : जयगड पंचक्रोशीत आंबा, काजूचे नुकसान

परराज्यावर अवलंबून राहण्याची भीती

सुरूवातीचा आंबा कमी असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात तरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा बागायतदार बाळगून होते. पण बिघडलेल्या वातावरणामुळे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.

अखेरचा आंबा व्यवस्थित येईल की नाही, अशी चिंता त्यांना भेडसावते आहे. या स्थितीवरच आंबा ‘कॅनिंग’चे भवितव्य अवलंबून असते. अन्यथा, परराज्यातील आंब्यावर प्रक्रियेसाठी अवलंबून राहावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेले तीन दिवस अधूनमधून ढगाळ वातावरण आहे. तापमानात बदल होत आहेत. त्याचा परिणाम आंबा बागांवर होत आहे. अनेक ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला असून मोहोर गळून जात आहे.

- सलिल दामले, आंबा बागायतदार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com