
वावडे, जि. जळगाव ः वावडे व (ता. अमळनेर) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) रब्बी हंगामातील हरभरा पिकावर (Chana Crop) पाने खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव (Pod Borer On Chana) झाला आहे. अनेक कीटकनाशकांची फवारे करूनही ओळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
वावडेसह परिसरात या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणी लावलीनंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले.
आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे.
आता हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हरभरा पीक धोक्यात आले असून, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पिके परतीच्या पावसाने वाया गेली. अशा स्थितीत शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असून, वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.