
प्रकाश लिमये, भाईंदर
पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याआधी किंवा तक्रार दाखल झाल्यानंतर तडजोड करून प्रकरण शांततेने सोडविण्याचा सल्ला दिला जातो; पण तडजोड झाल्यानंतरही पुन्हा त्रास देण्याचे प्रकार घडतात.
हे प्रकार टाळण्यास महिलांना धैर्य एकवटण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्त मधुकर पांडे (Police Commissioner Madhukar Pandey) यांच्या सूचनेनुसार पोलिसांकडून महिलांसाठी (Police Women) पुन:धैर्य योजना सुरू करण्यात आली आहे.
घरगुती प्रकरणात किंवा अन्य काही बाबतीत महिलांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या व्यक्तींना एकत्र बसवून यशस्वी तोडगादेखील काढला जातो.
मात्र काही काळानंतर तोडगा निघालेल्या प्रकरणात महिलांना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात झाल्याचे दिसून येत असते. संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातही त्याचा प्रत्यय आला आहे.
याप्रकरणात श्रद्धाने सुरुवातीच्या काळात दाखल केलेल्या तक्रारीवर यशस्वी तोडगा काढण्यात आला होता. मात्र त्याचा शेवट अत्यंत भयावह असा झाला. या घटनेवरून पोलिसही आता सतर्क झाले आहेत.
तक्रारींचा पुन्हा आढावा
तोडगा निघालेल्या प्रकरणात महिलांना पुन्हा होणारा त्रास टाळण्यासाठी आयुक्त मधुकर पांडे यांच्या सूचनेनुसार पुन:धैर्य योजना सर्व पोलिस ठाण्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
संबंधित पोलिस ठाण्यामध्ये वर्षभरात महिलांकडून दाखल झालेल्या सर्वच तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे.
पोलिस ठाण्यातील महिला पोलिस दर शनिवारी संबंधित महिलांशी संपर्क साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या पुन्हा काही त्रास होत आहे का, याची चौकशी करणार आहेत.
एखाद्या प्रकरणात तसेच आढळले, तर लगेचच कारवाई केली जाणार आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.