
जळगाव : टपाल विभागाने सर्वसामान्यांना दिलेल्या दहा लाखांच्या अपघाती विमाकवच योजनेला (Insurance Scheme) जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठ महिन्यांत जिल्ह्यातील ३२ हजारांवर नागरिकांनी हा विमा उतरविला आहे. ग्रामीण विभागातून योजनेला अधिक प्रतिसाद आहे.
टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ३९९ व ३९६ रुपयांत वार्षिक दहा लाखांची अपघात संरक्षण विमा योजना जून २०२२ ला आणली.
योजना १८ ते ६५ वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे. विमाधारकाचा मृत्यू, कायमचे अपंगत्व, आंशिक अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. अपघात झाल्यास ६० हजार खर्च, बाह्य खर्चास ३० हजार रुपयांपर्यंत दावा करता येतो.
रुग्ण रुग्णालयात असल्यास दहा दिवसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये विमाधारकांना मिळतात. कुटुंबाला रुग्णाच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च दिला जातो.
अपघाती मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये व विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये दिले जातात. २९९ रुपयांच्या विमा योजना आहे.
मात्र तिला शिक्षण खर्च, वाहतूक व अंत्यसंस्कार खर्च लागू होत नाही. जिल्ह्यात टपाल विभागाने या योजनेची व्यापक जनजागृती केली आहे. अनेकांना या योजनेचा लाभ झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.