
परभणी ः कृषिपंपाचा वीजपुरवठा (Elctricity) तोडण्याची मोहीम थांबविण्याचे आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडू नये, असा स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यानुसार ‘महावितरण’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी (ता.१०) केली.
‘महावितरण’कडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. थकीत वीज देयकांमुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. देयके भरल्यानंतर पुन्हा जोडला जातो. परंतु फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडणे थांबवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.