
कोल्हापूर : सर्वसामान्य लोकांसह विविध संस्था, पक्ष नेते, गांधी विचाराचे लोक राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होत आहेत. त्यांच्या यात्रेमुळे मोठी सहानुभूती निर्माण झाली असून, या यात्रेमुळे विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता होण्यास मदत होईल, असे मत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी रविवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी श्री. पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा न्यायप्रविष्ट आहे. पंधरा दिवसांत या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू राहणार आहे. या सुनावणीच्या वेळेला महाराष्ट्राची बाजू योग्य मांडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकही बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचे योग्य मत मांडावे, असा निर्णय झालेला आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा श्री. पवार यांनी दिला.
पत्रकार परिषदेला आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.