Rain Update : खानदेशात पुन्हा पावसाळी वातावरण

खानदेशात गुरुवार (ता.१३) ते रविवार (ता.१६) कोरडे, सूर्यप्रकाशीत वातावरण होते. अशातच रविवारी मध्यरात्रीनंतर ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झाले. सोमवारी पहाटे धुळे, जळगाव, नंदुरबारातील अनेक भागात हलका पाऊसही झाला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

जळगाव ः खानदेशात (Khandesh Rain update) गुरुवार (ता.१३) ते रविवार (ता.१६) कोरडे, सूर्यप्रकाशीत वातावरण होते. अशातच रविवारी मध्यरात्रीनंतर ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झाले. सोमवारी पहाटे धुळे, जळगाव, नंदुरबारातील अनेक भागात हलका पाऊसही (Rainfall) झाला आहे.

Rain Update
Heavy Rain : चार जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी

शेतकरी चिंतेत आहेत. कारण या महिन्यात १३ ऑक्टोबरपर्यंत अनेक भागात पाऊस झाला. पिके हातची गेली. सोयाबीन, कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसाने रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे. दसरा सणालाच कोरडवाहू हरभरा, ज्वारीची पेरणी खानदेशात तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या काठावरील काळ्या कसदार जमिनीत केली जाते. परंतु यंदा ही पेरणी लांबली आहे.

Rain Update
Crop Damage : अतिवृष्टीबाधितांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या

कारण दसरा सणालाही पाऊस होता. यामुळे पूर्वमशागतीसाठी वाफसा नाही. काळ्या कसदार जमिनीत चांगला वाफसा होण्यासाठी सात ते आठ दिवस सूर्यप्रकाशीत वातावरण अपेक्षित असते. सोयाबीन घेवून त्यात हरभरा पेरणीचे नियोजनही अनेकांनी केले आहे. परंतु सोयाबीन पावसामुळे उभाच आहे. पाऊस थांबेल, अशी अनेक दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती.

गुरुवारी (ता.१३) अनेक भागात पाऊस थांबला. नंतर कोरडे व सूर्यप्रकाशीत वातावरणही तयार झाले. शनिवारी (ता.१५) गारवाही वातारावरणात तयार झाला. यामुळे शेतीकामांना वेग आला. परंतु रविवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले. दिवाळी सण २१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. फक्त तीन दिवसानंतर दिवाळी आहे. यातच कापूस वेचणी, सोयाबीनची काढणी, कापणी, मका मळणी आदी कामे शेतकऱ्यांना उरकायची आहेत.

अशात पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती व चिंता आहे. सोमवारी सकाळी धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर भागात हलका पाऊस झाला. जळगावमधील धरणगाव, एरंडोल, भुसावळ, जळगाव, जामनेरातही अनेक भागात हलका पाऊस झाला. नंदुरबारमधील धडगाव, नवापूर भागात हलका पाऊस झाला. काहीसा सुसाट वाराही होता. सुमारे १० ते १२ मिनीटे हलका पाऊस झाला.

पावसाळी वातावरणामुळे कामे ठप्प..

पावसाळी वातावरणामुळे कापूस वेचणी, फवारणीची कामे सोमवारी ठप्प झाली. तसेच कापणी, मळणी व रब्बीच्या पेरणीला पूर्वमशागतही सुरू होवू शकली नाही. केळीची काढणीही ठप्प झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे फळ पिकांच्या दरांवरही परिणाम होतात.

कारण काढणी रखडले. पावसाळी वातावरण दूर झाल्यानंतर काढणी सुरू होते. त्या वेळेस आवक अधिक असते. यामुळे दर कमी होतात. दिवाळीलाच पावसाचा धूमाकूळ सुरू होईल, अशी भिती पुन्हा शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com