Barsu Refinery Protest : अन्यथा उच्च न्यायालयात जाणार ; रत्नागिरी जिल्हाबंदी प्ररकरणी राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

Raju Shetti On Barsu Refinery : बारसू रिफायनरी प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी शेट्टी यांना याबाबतची नोटीसही दिली होती.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Barsu Protest Update : बारसू रिफायनरी प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी शेट्टी यांना याबाबतची नोटीसही दिली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीचा आदेश मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तसेच बारसुतील स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आपण जाणारच असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले आहे.

शेट्टी म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला जबाबदार धरत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला जिल्हाबंदी केली असून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या परिसरात भेट देणे, बैठका न घेण्याबाबतचे मनाई आदेश काढले आहेत.

Raju Shetti
Barsu Refinery Project : बारसूचा मुद्दा पेटणारं ; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी

त्याचबरोबर समाज माध्यमांवर या संदर्भात लिहिणे, बोलणे आणि व्हिडीओ प्रसारीत करणे यालाही बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर असून संविधानाने मला दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे. माझ्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, असे शेट्टी यांनी सांगितले आहे.

Raju Shetti
Barsu Refinery : मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये; राजू शेट्टींचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

रत्नागिरी जिल्हाबंदीविरोधात शेट्टी यांच्यावतीने अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे.

तसेच त्यांनी ही कारवाई तातडीने मागे घ्यावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही या नोटीशीमध्ये सांगण्यात आले आहे.

तसेच मी दिर्घकाळापून विधानसभा, लोकसभेत काम करत असून परंतु कधीही मला सभापतींनी असंसदीय शब्दांबद्दल किंवा अर्वाच्य बोलल्याबद्दल साधी समजही दिली नाही.

असे असताना मला समाज माध्यमांवर लिहायला, बोलायला बंदी घालणे ही लोकशाहीची क्रूर चेष्टा असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या आठवड्यात प्रकल्पासाठीच्या माती परिक्षणाला विरोध करत स्थानिकांनी आंदोलन केले होते.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये अनेक आंदोलनक जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी शेट्टी यांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आपण कोणतीही तारीख न सांगता बारसुमध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना जिल्हाबंदीची नोटीस पाठवली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com