सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांत हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ (Elephant Herd Rampage) सुरूच आहे. बुधवारी (ता. १७) सोनावल येथील अनेक शेतकऱ्यांच्या नारळ, केळी आणि भातपिकाचे हत्तीच्या कळपाने (Paddy Crop Damage By Elephant Herd) मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सतत होणाऱ्या नुकसानीमुळे या भागातील शेतकरी हतबल झाले आहेत.
दोडामार्ग तालुक्यात टस्कर, मादी आणि तीन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कळपाने केर, मोर्ले, पाळये, सोनावल परिसरात शेतीचे नुकसान केले आहे. बुधवारी रात्री सोनावल येथे या कळपाने धुमाकूळ घातला.
या गावातील रघुनाथ सोनवलकर यांच्या उत्पादनक्षम २५ नारळ, २५० केळी आणि भातपिकाचे नुकसान केले. याशिवाय वसंत सोनवलकर, रवींद्र सोनवलकर यांच्या भातपिकाचेदेखील हत्तींच्या कळपाने मोठे नुकसान केले. रात्री अकरानंतर हत्तींचा कळप गावात येत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भातपिकाची काही दिवसांपूर्वीच लागवड झालेली असल्यामुळे हत्तींचा कळप शेतीतून गेल्यानंतर पिकाचे पूर्णतः नुकसान होत आहे. हत्तींच्या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.