
तुमच्या आग्रहानुसार शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, मात्र त्यासाठी तुम्ही २४ तासांत महाराष्ट्रात आले पाहिजे. मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधा, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांना केले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्लावजा इशाराही राऊत यांनी दिला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आपला गटच मूळ शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला मुंबईत परतण्याचे आव्हान केले.
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानं शिवसेनेला अक्षरशः घाम फोडलाय. पण, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा संजय राऊत करताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. "आम्हाला फसवणूक नेले,"असे एकनाथ शिंदे यांच्या गटातून आपली सुटका केलेल्या या दोन आमदारांनी सांगितले. आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या अपहरण आणि सुटकेची कहानी यावेळी सांगितली.
यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे गटाला मुंबईत येण्याचे आवाहन केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढली. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आलाय. आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असा टोलाही राऊतांनी शिंदे यांना लगावला. दरम्यान, शिवसेनेने आपला मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासोबत एकनाथ शिंदे गटाला वेळीच सावध होण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.