Agriculture Education : तिसरी ते बारावीपर्यंत शेतीचे धडे गिरविण्याची शिफारस

शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon

Mumbai News : शालेय शिक्षणात कृषी (Agriculture Education In School) विषय समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत. तज्ज्ञ समितीने याबाबत शिफारस केली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. याबाबत उद्या (ता. २८) बैठक होईल.

शेती विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात कसा करता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील तज्ज्ञांची संयुक्त समिती गठित केलेली आहे. या समितीने याविषयी सविस्तर प्रस्ताव तयार करून तो सादर केला आहे.

Agriculture Education
Agriculture In Education : शालेय शिक्षणातील कृषी विषयाचा अहवाल सादर

तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात कृषी आशयाचा अभ्यासक्रम असेल. या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्त्व, उपयोजन शेत व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव जागृती अशा अनेक पैलूंकड़े विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले जाईल. प्रामुख्याने कृषी केंद्रित आशयाच्या आधारे अध्ययन केले जाईल.

तिसरी ते बारावीपर्यंत शेतीविषयक अभ्यासक्रम राबविण्यासाठी कृषी विषयाचे शालेय अभ्यासक्रमात इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीसाठी स्वतंत्र विषय म्हणून घटकाचा समावेश केला जाईल.

समितीच्या अहवालानुसार कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात एकात्मिक स्वरूपात, कृषी स्वतंत्र विषयाचा समावेश केला जाईल. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने शालेय शिक्षणात अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

Agriculture Education
Agriculture Education : 'पशुसंवर्धन' पदविका अभ्यासक्रमाचे स्वागत, पण...

व्यवसायाभिमुख शिक्षण

शिक्षण व्यवसायभिमुख व्हावे, या दृष्टीने ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य गुणात्मक आराखड्यानुसार नववी आणि दहावी स्तरावर एकूण १२ विषय सुरू करण्यात आले आहेत.

यात ‘कृषी - सोलनेशियस पीक उत्पादक’ या विषयाचा समावेश केला आहे. तर इयत्ता अकरावी आणि बारावी स्तरावर १२ विषयांपैकी ‘कृषी सूक्ष्म इमॅजिनेशन तंत्रज्ञ’ या विषयाचा समावेश केला आहे.

यासोबत अकरावी-बारावीच्या किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमात ॲग्रिकल्चर ग्रुपमध्ये नर्सरी, पीक तंत्रज्ञान, द्विलक्षी अभ्यासक्रमात पशुविज्ञान आणि दूग्ध, तसेच पीक तंत्रज्ञान आणि बागकाम या विषयांचा समावेश आहे.

उपसमितीकडून मसुदा सादर

शालेय अभ्यासक्रमातील कृषिविषयक अभ्यासक्रमाच्या विषयासाठी मुख्य समितीला साह्य व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांची उपसमिती नियुक्त केली होती. ही समिती, उपसमितीमार्फत शालेय अभ्यासक्रमात शेती विषयासंदर्भात समाविष्ट करावयाच्या घटक व उपघटकांवर इयत्तावार सखोल चर्चा करून दोन प्रकारचे मसुदे तयार केले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com