Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; अमोल मिटकरी यांची मागणी

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तार यांच्या विधानाचा कडकडून समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरही टीका केली आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Abdul Sattar राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अशाच एका विधानामुळे सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. शेतकरी आत्महत्यांसदर्भात (Farmer Suicide) सत्तार यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. सत्तार यांच्या विधानाचा विरोधकांनी तीव्र निषेध केला असून कृषीमंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सत्तार यांच्या विधानाचा कडकडून समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरही टीका केली आहे.

शेतकऱ्याप्रती बेताल वक्तव्य करणाऱ्या सत्तार यांची शिंदे फडणवीस पाठराखण करत आहे. सरकारने शेतकऱ्यांना विषाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केला असल्याची घणाघाती टीक मिटकरी यांनी सरकारवर केली आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar : सिल्लोड महोत्सव रद्द करण्याची अनिल घनवटांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे खरचं शेतकऱ्यांचे दु:ख जाणत असतील, तर त्यांनी आजच्या आज अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी केली पाहिजे. अथला सभागृहात सत्तार यांना माफी मागायला लावण्याची मागणी मिटकरी यांनी केली.

सत्तार यांचे हे वक्तव्य हे देशातील तमाम शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषीमंत्री पदावरून सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे, असेही मिटकरी म्हणाले.

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; शेतकरी आत्महत्येवर असंवेदनशील वक्तव्य

काय म्हणाले होते सत्तार?

कृषीमंत्री असलेल्या सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, या शेतकरी आत्महत्यांसदर्भात बोलताना सत्तार यांनी असंवेदनशील वक्तव्य केले आहे.

शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असं बेजबाबदार वक्तव्य राज्याच्या कृषीमंत्रिपदी असलेल्या सत्तार यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सत्तारांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषीमंत्री आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे. या मुद्यावरून पाटील यांनी सत्तारांसह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com