
सातारा : शास्त्रोक्त पद्धतीने भुईमूग लागवड (Groundnut Cultivation) केल्यास उच्चांकी उत्पादन (Production) घेणे शक्य असल्याचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डी. एम. काळे यांनी सांगितले.
कणूर (ता. वाई) येथे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत (ATMA) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने (Millet Year) जागरूकता कार्यक्रम तसेच तेलबिया पिकाचे समूह आद्यरेखा प्रात्यक्षिक राबविण्यासाठी भुईमुग लागवड तंत्रज्ञान विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री. काळे बोलत होते. तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विषय विशेषज्ज्ञ संग्राम पाटील यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले.
विषय विशेषज्ञ महेश बाबर यांनी केव्हीके बोरगावमार्फत राबविण्यात येत असलेल्या भुईमूग पिकाच्या फुले चैतन्य या पिकाचे समूह आद्यरेखा प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन केले.
कृषी साहायक धनाजी फडतरे यांनी भुईमूग पिकाच्या फुले चैतन्य या वाणाच्या लागवडीसाठी आवश्यक बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, पाणी व खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सरपंच निखिल राजपुरे, जगन्नाथ राजपुरे, मारुती राजपुरे, तानाजी यमगर, ललिता बोडके, निखिल मोरे, विलास भुसारे, योगेश जायकर, प्रगतिशील शेतकरी सुनील राजपुरे, संदीप राजपुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देवरे यांनी केले. रवींद्र यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.