
अकोला ः राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक (Soybean Cotton Rates) शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी अनुकूल धोरण आखणे गरजेचे आहे, अशी मागणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता.२९) सत्तार यांची भेट घेत या मुद्द्यांवर मागणी केली होती.
त्यानंतर कृषिमंत्र्यांनी तातडीने या मागण्यांबाबत केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे. सत्तार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा. यावर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसानही झाले. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
त्यातच सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्न बाजारात आले असता या दोन्ही पिकांच्या खरेदीदरात घसरण झाली आहे. राज्यात एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के सोयाबीन उत्पादक आहेत. देशभरातील सोयाबीन पिकाच्या एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्र राज्याचा वाटा ४० टक्के आहे. यावर्षी सोयाबीन पिकाचा लागवड खर्च ५७८३ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढलेला आहे. दुसरीकडे सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल होता. कापसाचीही अशीच स्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.