मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून महिला सन्मानाचे भाषण केले आणि लगेचच त्यांच्या राज्यातील भाजपच्या सरकारने बिल्किस बानो प्रकरणात (Bilkis Bano Case) लज्जास्पद काम करणाऱ्यांना सोडून दिले, हे अतिशय चिंताजनक आहे, अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर टीका केली.
तसेच येथून पुढे राज्याचा दौरा करणार असून त्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून करणार आहे. ठाण्यात जास्त लक्ष द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. श्री. पवार हे ठाणे येथे मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. पवार म्हणाले, भाजपकडून देशात संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यांनी अनेक आश्वासने दिली मात्र, पाळली नाहीत. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी महिला सन्मानार्थ भाषणात उल्लेख केला. मात्र, लगेचच भाजपची सत्ता असलेल्या त्यांच्या राज्यातील सरकारने बिल्किस बानो यांच्याबाबत लज्जास्पद आणि घृणास्पद काम करणाऱ्यांची सुटका केली. केवळ बोलून चालत नाहीत, तर जे बोलले आहोत ते कृतीत आणावे लागते. भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढ होत आहेत.
पवार पुढे म्हणाले, ‘‘२०२२ पर्यंत प्रत्येकाला २४ तास वीज देऊ असे आश्वासन दिले होते. अर्थव्यवस्था बळकट करू असे सांगितले होते. आजही देशातील ४४ टक्के लोकांना वीज मिळत नाही. वाढती महागाई हे ढासळत्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक आहे.’’
निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार
ठाण्यातील बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, मी ठाण्यात बैठकीसाठी आलो होतो. येथील आढावा घेतला आहे. यापुढे हा आढावा घेत राहणार आहे. येथे विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले. तसेच अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला आहे. मीही काही निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.