मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) सुनावणी न घेताच चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे (Uddhav Thakrey) गटाने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी याचिका दाखल केली असून निवडणूक आयोगाने नैसर्गिक तत्त्व जपले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. ११) या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. आमदार अपात्र ठरले तर आता जो घोळ निवडणूक आयोगाने घातला आहे,
तो कोण निस्तरणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय शनिवारी (ता. ८) रात्री घेण्यात आला. या निर्णयाआधी सुनावणी घेऊन शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्याचा संधी देण्याची गरज होती.
मात्र, तसे झाले नाही, असे अनिल देसाई यांनी याचिका दाखल केल्यानंतर सांगितले. काय आहे याचिका... निवडणूक आयोगाने नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ठाकरे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायांना संरक्षण मिळावे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्हे फ्री सिम्बॉल यादीत नाहीत. पण आम्हाला चिन्हे निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पर्याय दिले आहेत, त्यापैकी एक चिन्ह मिळावे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.