
सोलापूर ः येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (Siddheshwar Sugar Factory ) हा शेतकरी आणि कामगारांचे वैभव असून, या कारखान्याच्या चिमणीबाबत सुरू असलेली कारवाई थांबवावी, येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा, राज्यातील सहकारी व खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यांचे गाळप रोखण्याबाबत टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सरकारला दिला आहे.
सिद्धेश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनने नऊ दिवसांपासून कारखान्याच्या कार्यस्थळावर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांनी सुरू केलेल्या कारखाना बचाव लढ्याला पाठिंबा दिला. त्या वेळी काळे यांनी हा इशारा दिला आहे. श्री. काळे म्हणाले, की चिमणी पाडल्यानंतर कारखान्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी दिशाभूल करणारी विधाने तांत्रिक ज्ञान नसलेली मंडळी करीत आहेत. ज्यांना कारखानदारीचा कोणाताही गंध नाही त्यांनी अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, असेही ते म्हणाले. या वेळी काळे यांनी, मंडळाचे उपाध्यक्ष अशोक बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या लढ्याचे कौतुक केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.