Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

उशिराने जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरली आहेत.
Pune Dam
Pune DamAgrwoon

पुणे : उशिराने जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरणांतील पाणीसाठ्यात (Dam Water Level) वेगाने वाढ झाली. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर उर्वरित १० धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Water Stock) झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाई (Water Shortage) कमी होण्यास मदत झाली आहे.

Pune Dam
Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

हवामान विभागाने चालू वर्षी पहिल्या टप्यात ९९ टक्के, तर दुसऱ्या टप्यात १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जून महिन्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ८३.१ मिलिमीटर म्हणजेच ४७ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी ४३७.५ मिलिमीटर म्हणजेच १४१ टक्के पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के अधिक पाऊस पडल्याची स्थिती आहे. ऑगस्टमध्येही सुरुवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांत पाण्याची वेगाने आवक कमीअधिक होत आहे. गुरुवारीही सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ६.४५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

Pune Dam
Rain : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत १९२.५९ टीएमसी म्हणजेच ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत एकूण २९.१५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत ४८.२३ टीएमसी म्हणजेच ९९.७९ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, भाटघर, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के, तर कासारसाई, भामा आसखेड, वीर या धरणांत ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे या धरणांत ९० टक्क्यांहून अधिक, तर माणिकडोह, चिल्हेवाडी, घोड धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. विसापूर धरणांत ०.९० टीएमसी म्हणजेच १०० टक्के, उजनीत ५२.९१ टीएमसी म्हणजेच १०० टक्के, तर मुळशी धरणांत २०.१६ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे शहरासह शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न सुटला असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे.

ही धरणे शंभर टक्के भरली

टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, विसापूर, मुळशी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com