
अकोला ः पावसाने पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने सोयाबीन काढणीसाठी (Soybean Harvesting) हा पाऊस मारक ठरण्याची चिन्हे आहेत. काही गावशिवारात तर रात्रभर रिमझिम पाऊस (Rainfall) झाला. त्यामुळे सोयाबीन सोंगणी, मळणीला अडचण तयार झाली.
सोयाबीनचे पीक सर्वत्र काढणीसाठी तयार होत आहे. लवकर निघणाऱ्या जातींच्या सोयाबीनची काढणी आठवडाभरापासून जोमाने सुरू झाली. यंदा सोयाबीनची मजुरांद्वारे केली जाणारी सोंगणी महागली आहे. कुठे २८०० रुपये, तर कुठे साडेतीन हजार रुपयांपर्यंत एकरी दर चुकवावा लागत आहे.
तर जेथे सोयाबीनची काढणी झाली त्या भागात अनेकांना तीन ते आठ क्विंटलदरम्यान उतारा लागत असल्याचे आकडे समोर आले. यावरून सोयाबीनची उत्पादकता आधीच कमी झाल्याचे स्पष्ट आहे. हातातोंडाशी आलेला खास पावसामुळे यंदाही हिरावतो की काय अशी शंका निर्माण होत आहे.
सोयाबीन काढणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पाऊस नको आहे. सोयाबीनच्या झाडांवर ५० टक्के शेंगा वाळलेल्या आहेत. विविध हवामान तज्ज्ञांकडून आणखी तीन ते चार दिवस पाऊस होऊ शकतो, अशा पोस्ट समाज माध्यमातून फिरवल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.
ऐन दसऱ्याच्या दिवशी आलेल्या पावसाने सोयाबीनची सोंगणी करून ठेवलेल्यांच्या मनात धडकी भरवली. रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने गुरुवारी शेतांमधील सर्वच कामे ठप्प पडली. दिवसभर ढगाळ वातावरणही तयार झालेले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.