
Paddy Farming News रसायनी : रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भातलावणी (Paddy Transplanting) कामांची लगबग सुरू झाली आहे. परिसरात पाताळगंगा नदीच्या (Patalganga River) काठच्या गावातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा; तसेच जांभिवली गावाच्या हद्दीतील माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या (Bamnoli Dam) पाण्याचा उपयोग होत आहे.
जांभिवली पंचक्रोशीतील आणि मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा आधार आहे. त्यावर शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे.
यंदाच्या हंगामात अवनी, रत्ना याशिवाय इतर संकरित जातींच्या वाणांची पेरणी केली आहे. परिसरात आठवडाभरापासून लावणीची कामे सुरू झाली आहेत. बियाणे पेरणीनंतर रोपांच्या वाढीसाठी थंडीचे अनुकूल वातावरण असल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे.
सध्या हवामानात बदल झाला असला, तरी वातावरण लवकर निवळले, अशी शक्यता शेतकऱ्यांमध्ये आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आठ-दहा दिवस लवकर लावणीची कामे सुरू झाली आहे.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही दुबार भातपीक चांगले येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे, असे कोडीलकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.