
Agriculture Electricity News बोर्डी, जि. अकोला ः अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत धारूळ ऊर्फ रामापूर येथे काही दिवसांपूर्वी नवीन विद्युत उपकेंद्र (Power Station) मंजूर झाले आहे. त्या विद्युत उपकेंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांनी मोजमाप करून पाहणीसुद्धा झाली. हे काम तातडीन सुरू केले जावे अशी मागणी शेतकऱ्यांनी (Agriculture Electricity) आमदार प्रकाश भारसाकडे यांच्याकडे केली आहे.
वीज वाहिन्यांवर पडलेल्या अतिरिक्त दाबामुळे सतत वीज जाते. वीज सुरळीत मिळत नाही. अशा परिस्थितीत सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे.
शेतात गहू, हरभरा, मका, कांदा, टरबूज, संत्रा आदी पिके आहेत. सतत वीज जात असल्याने शेतकरी पूर्णपणे त्रस्त झाले आहे.
पिकांना पाणी मिळत नसल्याने सुकण्याची पाळी आली आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन काही दिवसांपूर्वी लखमापूर नागापूर उपकेंद्रावर मोर्चा नेला होता.
तेव्हा कनिष्ठ अभियंता रमेश चांदूरकर यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले होते. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
अतिरिक्त दाबाची समस्या दूर करण्यात येईल. दुसरीकडून पर्यायी मार्गाने खांब उभारण्याचे काम सुरू आहे, असे अभियंता चांदूरकर यांनी सांगितले होते. मात्र आता २० ते २५ दिवस होऊन सुद्धा विजेचा त्रास कमी झालेला नाही.
दररोज विजेचे जाणे-येणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एक दिवसाआड ८ ते १० रोहित्र बंद करून ट्रॅपिंग करण्यात येत आहे. पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मंजूर असलेल्या विद्युत उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी येथील शेतकऱ्यांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.