Water Storage : गिरणातील धरणातील साठा ४९ टक्क्यांखाली

खानदेशातील जलसाठा हळूहळू घटत आहे. पाण्याचा वापर वाढत आहे. उष्णता या महिन्यात कमी राहीली, पण रब्बीचे आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी विविध गावे, शहरांना पाणी द्यावे लागत आहे.
Girna Dam
Girna DamAgrowon

Jalgaon News खानदेशातील जलसाठा (Khandesh Water Stock) हळूहळू घटत आहे. पाण्याचा वापर वाढत आहे. उष्णता या महिन्यात कमी राहीली, पण रब्बीचे (Rabi Irrigation) आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी विविध गावे, शहरांना पाणी द्यावे लागत आहे. एकूण जलसाठा ४८ टक्के असून, त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातील (Girna Dam) जलसाठा ४९ टक्क्यांखाली आला आहे.

गिरणा धरण सलग चार वर्षे १०० टक्के भरले. त्याची साठवण क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. त्यातून रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्यात आली. तसेच टंचाई निवारणार्थ धरणातून नदीत तीन वेळेस पाणी सोडण्यात आले आहे.

शिवाय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, नाशिकमधील मनमाड शहराच्या पाणी योजनादेखील गिरणा धरणावर अवलंबून आहेत.

यामुळे प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी झाला. मागील महिन्यात प्रकल्पातील जलसाठा ५३ टक्के असा होता. त्यात महिनाभरात सुमारे ४ टक्के एवढी घट झाली आहे.

Girna Dam
Shiwani Water Project : ‘शिवणी’च्या पाझर नियंत्रणासाठी स्वाभिमानी संघटना करणार आंदोलन

जळगाव जिल्ह्यातील रावेरातील अभोळा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ, एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, जामनेरातील वाघूर, तोंडापूर, चाळीसगावमधील मन्याड, भुसावळातील तापी नदीवरील हतनूर, पारोळ्यातील तामसवाडी, बोरी आदी प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळ्यातील अनेर, पांझरा, मालनगाव, सोनवद आदी प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते.

Girna Dam
Water Storage : ‘कुंभी’त ६५ टक्के पाणीसाठा

नंदुरबारमधील दरा, सुसरी हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. तसेच लहान - मोठे सुमारे ५१ तलाव, लहान प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. या प्रकल्पांतील जलसाठाही कमी झाला असून, तो एकूण ४८ टक्के असा आहे.

धुळ्यातील बुराई, अमरावती, जळगावमधील भोकरबारी या प्रकल्पांतील जलसाठा १०० टक्के नव्हता. त्यातील साठा आता कमालीचा कमी झाला आहे.

जळगावमध्ये हतनूर व वाघूर प्रकल्पाची साठवण क्षमता नऊ टीएमसी एवढी आहे. यात हतनूर प्रकल्पात ५४ टक्के गाळ आहे. त्यातून भुसावळातील दीपनगर औष्णिक प्रकल्प, वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा केला जातो. तसेच त्यातून चोपडा, यावल व रावेरात रब्बीसाठी दोन वेळेस पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे त्यातील जलसाठा २८ टक्क्यांपर्यंत आला आहे. या प्रकल्पातील जलसाठा मे अखेरीस तळ गाठू शकतो, असेही संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com