
पाचोरा, जि. जळगाव : ‘‘थकीत वीजबिलांच्या (Electricity Bll) नावाखाली वीज महावितरण (Mahavitaran) कंपनीकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा (Power Supply Shutdown) डीपीसह बंद केला जात असून, हा प्रकार थांबवा; अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सेनास्टाईल आंदोलन करण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरणची असेल,’’ असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड, अभय पाटील यांनी दिला.
शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात ॲड. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शेतकरी सेनेचे अरुण पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत उपस्थित होते. ॲड. पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा तसेच आरएसएस व भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे जे धोरण विकसित केले जात आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
ॲड. पाटील म्हणाले, ‘‘वीजवितरण कंपनीने थकीत वीजबिलाच्या नावाखाली वीज डीपीचा सरसकट वीजपुरवठा बंद करण्याचे धोरण थांबवावे. कारण राज्य अन्न आयोगाकडे अॅड. तल्लार यांच्यासह शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात जी तक्रार केली होती, त्याचा निकाल राज्य अन्न आयोगाने दिला आहे.
आयोगाने वीज वितरण कंपनीला स्पष्ट सूचित केले आहे, की थकीत वीजबिलाच्या कारणाखाली कोणत्याही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये. इतर कायदेशीर बाबींचा अवलंब करून आपल्या वीजबिलाची वसुली करावी, असे असताना वीजवितरणकडून वीज बंद करण्याचे धोरण सुरूच ठेवण्यात आले आहे. हा आयोगाच्या निकालाचा अवमान आहे.’’ अरुण पाटील यांनीही वीज वितरणच्या वीजबंद करण्याच्या धोरणावर टीका केली. अनिल सावंत यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.