
Unseasonal Rain नांदेड : जिल्ह्यात वादळी पावसासह वारे व गारपिटीचा (Hailstorm) सुमारे १९ हजार ८९९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यात एकूण १९ हजार ८९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
यात जिरायती अकरा हजार ३७६ हेक्टर, बागायत दहा हजार ६३६ हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे एक हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे (Crop Damage) बाधित क्षेत्र असल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वादळी वारे व गारपीट झाली होती. यात अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा समावेश आहे.
या गारपिटीमुळे तीन टक्क्यांनुसार ९१७ शेतकऱ्यांच्या ६९८ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. उरलेले पंचनामे येत्या चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. याचबरोबर विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा व्हावी यासाठी विमा कंपन्यांना निर्देश करण्याची मागणी केली.
याचबरोबर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना नुकसानीबाबत माहिती देऊन तत्काळ पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नऊ तालुक्यांना फटका
वादळी पावसाचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला. यात १९ हजार ८९९ शेतकरी बाधित झाले आहेत. गारपिटीमुळे ११ हजार ३७६ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
तर १० हजार ६३६ हेक्टर क्षेत्र बागायतीचे बाधित झाले आहे. तर १५४२ हेक्टर क्षेत्र फळपिकांचे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.