परभणी ः साखर श्(Sugarcane) आणि इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करणाऱ्या दोन कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे (Shetkari Sanghatana) क्रांती दिनी मंगळवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता पाथरी (जि. परभणी) येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील ऊस परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी युवा आघाडी अध्यक्ष रामेश्वर गाडे, महिला आघाडी अध्यक्ष विमलताई आकनगिरे, मराठवाडा विभाग प्रमुख बंडू सोळंके आदि उपस्थित राहणार आहेत.
दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यांमध्ये हवाई अंतराची घातल्याने महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या भ्रष्ट, अकार्यक्षम कारभाराला संरक्षण मिळाले आहे. गुजरात, उत्तरप्रदेश आदी राज्यात उसाला प्रतिटन ३५०० रुपयेहून अधिक दर मिळत आहे. परंतु महाराष्ट्रातील साखर कारखान्यात काटामारी, वजनचोरी, रिकव्हरी चोरी, ऊस तोडणी मजुरांची प्रचंड मनमानी वाढली आहे.साखर कारखानदार शेतकऱ्यांची अघोरी पद्धतीने लुट करत आहेत.
यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऊस परिषेदत विचार मंथन केले जाणार आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, भागवत जावळे पाटील, सय्यद जामकर, भारत फुके, कृष्णा भोसले, शिवाजीराव बोबडे, रमेश माने आदींनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.