
परतूर, जि. जालना : निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाणीसाठा (Water Stock), दमदार पावसामुळे विहिरी व तलावामध्ये उपलब्ध झालेले पाणी, सिंचनाची (Irrigation) सोय यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे (Sugarcane Cultivation) शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यातील शेतशिवारात सध्या उसाची लागवडीची लगबग दिसून येत आहे.
परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात पावसाळ्यामध्ये मोठी भर पडली. त्यातच तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढली. शिवाय ठिकठिकाणच्या तलावातील पाणीसाठ्यातही वाढ झालेली आहे.
शेतशिवारास यंदा सिंचनाची व्यवस्था झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यातच यंदा माँ बागेश्वरी कारखान्याने गाळप क्षमता वाढवलेली आहे.
उसाचे अधिकाधिक गाळप करण्याचा बागेश्वरी साखर कारखान्याचा प्रयत्न आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवलेली आहे. परिसरातील उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना सुरू राहील
-शिवाजीराव जाधव, अध्यक्ष, बागेश्वरी साखर कारखाना ,परतूर
यावर्षी उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. परिणामी उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली. आहे. उसाच्या पिकातून यंदा आर्थिक उत्पन्न समाधानकारक लाभेल अशी आशा आहे.-शंकर उबाळे, शेतकरी, परतूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.