
Sugarcane Farming जिल्ह्यात महिनाभरापासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत (River Water Level) झपाट्याने घट झाली आहे. काही नद्यांची पात्रे कोरडी पडल्यामुळे त्या नद्यांवर अवलंबून असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.
यावर्षी परतीचा पाऊस लांबला होता. त्यानंतर अनेक गावांमध्ये पाणीपातळी कायम राहावी याकरिता मातीनाले बंधारे, वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थांनी राबविला.
त्यामुळे पाणीपातळी टिकून राहील असा अंदाज होता. परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या.
मार्च, एप्रिलमध्ये तर अनेकदा पारा ३९ अंशाच्या वर गेला. सातत्याने वाढलेल्या तापमानाचा परिणाम त्या त्या वेळी आंबा, काजू यांसह विविध फळपिकांवर दिसून आला. परंतु त्यापेक्षा अधिक भयावह परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे.
वैभववाडीतील शुक, शांती, गोठणा, कुसूर, करूळ, कणकवलीतील जानवली, गडनदी या नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. वैभववाडीतील शुक नदीचे पात्र कोरडे पडले असून, त्यामुळे या नदीवर अवलंबून असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.