
रसायनी ः पनवेल तालुक्यातील जांभिवली गावात माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून (Bamnoli Dam) जांभिवलीतील शेतकऱ्यांना दुबारा हंगामातील पिकांसाठी १५ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे.
धरणाच्या पाण्यावर जांभिवली आणि बाजूच्या गावांतील शेतकरी दुबारा हंगामात भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. त्यामुळे जांभिवली परिसरात हरितक्रांती झाली आहे.
जांभिवली येथील बामणोली धरण ३९ वर्षांपूर्वी बांधले आहे. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आणि इतर आदिवासी वाड्यांतील शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतकरी बारमाही शेतात पीक घेत असल्याने विहीर, विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहते.
खरिपाच्या हंगामात भाताचे पिक घेतले जाते. सिंचन साधनाचा मोठा आधार मिळाल्याने दुबारा भाताचे तसेच भेंडी, काकडी, घोसाळी, कारली, शिरोळी, दुधी, मिरची, वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जनावरांनाही बारा महिने हिरवा चारा मिळू लागल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.