
नगर ः शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) ही बाब गंभीर आहे. आत्महत्याप्रकरणी केली जाणारी कार्यवाही प्रमाणेच महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अकोळनेर (ता. नगर) येथील पोपटराव जाधव यांची वीज (Electricity) तोडल्याने आत्महत्या केली. याप्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (ता. १) अकोळनेर (ता. नगर) येथे जाधव कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर नगरला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाची आढावा बैठक घेतली.
प्रशासनातील व वितरण विभागाचे अधिकारी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोळनेर (ता. नगर) येथील जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तातडीने कोणत्या पद्धतीने मदत करता येईल. या दृष्टिकोनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
वीज तोडणीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. वीजपुरवठा तोडण्याचे नियम सांगा? मागील वर्षीचे बिल कोणत्या पद्धतीने काढले. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे पूर्ण नुकसान झाले मग बिल का दिले, असे प्रश्न उपस्थित केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.