टाकरखेडा संभू, अमरावती : भातकुली तालुक्यातील लसणापूर येथील एका शेतकऱ्याने चार एकर हरभरा पिकावर (Gram Crop) ट्रॅक्टर (tractor) फिरविला आहे. मर रोगाचा (MarRog) प्रादुर्भाव झाल्याने या पिकाची उत्पादन क्षमता खालावली आहे. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.
येथील रहिवासी असलेले शेतकरी सतीश प्रल्हादराव तडकित यांना सततच्या पावसामुळे खरिपाने दगा दिला. त्यामुळे रब्बीमध्ये त्यांनी आपल्या सहा एकर शेतामध्ये हरभऱ्याची लागवड केली होती.
या पिकावर त्यांच्या सर्व आशा पल्लवीत असताना अलीकडे मर रोगाचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर वाढला. त्यामुळे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले. तसेच उत्पादन क्षमता कमी झाली.
आगामी काळात हरभऱ्याची काढणी करता लागणारा खर्च झेपणार नसल्याने तडकित यांनी चक्क आपल्या सहा पैकी चार एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर चढवून पीक नष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.