
टाकरवण, जि. बीड : वर्ष १९७० ते २००० या काळात गावात उताराच्या ठिकाणी तलाव (Water Talav) बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता हे गाव तलाव (village Talav) अखेरच्या घटका मोजत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
या तलावाच्या भरवशावरच शेती केली जाते. गुराढोरांची तहान भागते. नागरिकांना हक्काचे पाणी मिळते. तलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतांत वाढ व्हायची. परंतु आता सर्वच तलाव दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहेत. विशेष म्हणजे गावात आजतागायत नळ योजना नाही. नुकतीच पाणी योजना मंजूर झालेली आहे.
ग्रामस्थ विहिरींतून पाणी आणतात. असे असतानाही पाणी बचतीसह तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पूर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्या समान झाले आहे. परिणामी गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. या गावतलावांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सात वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व नाम फाउंडेशन यांनी लोकसहभागातून गाळ उपसा केला. त्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले. परंतु त्यानंतर दुर्लक्ष झाले. पाणीटंचाईची समस्या सार्वत्रिक बनली असताना पाझर तलाव आणि गावतलाव परिसरात अनधिकृत विहिरी, वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे वाढली आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी जलस्त्रोत अडवून अवैध पाणी उपसा सुरू आहे. टाकरवण परिसरात एकूण सहा तलाव असून चार पाझर तलाव आहेत. तर दोन सिंचन तलाव असून ते जिल्हा परिषदेचे आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या तलावांवर अनेक शेतकरी आपला मालकी हक्क गाजवत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.