
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)ः सध्याच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी, देशातील सरकारी (Government Sector) आणि खासगी क्षेत्राने चौकटी बाहेरील विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या वतीने देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये शुक्रवारी (ता. १३) पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, अर्थतज्ज्ञ शमिका रवी यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या वेळी अर्थतज्ज्ञांनी देशाच्या विकासाची गती टिकवण्याबाबत सूचनादेखील केल्या. ‘जागतिक स्तरावरील सध्याच्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपल्या धोरणांच्या जोरावर जगातील देशांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे जगाच्या पटलावर भारताचे स्थान विशेषत्वाने अधोरेखित झाले आहे,’ असे मत या वेळी अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.
सध्याच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धोक्यांप्रमाणेच, डिजिटायझेशन, ऊर्जा, आरोग्य आणि शेतीविषयक क्षेत्रांत अनेक संधीदेखील निर्माण होत आहेत, त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडच्या सरकारी आणि खासगी क्षेत्रांनी चौकटी बाहेरच्या संकल्पना मांडायला हव्यात; त्या दृष्टीने विचार करायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.